Thursday, 6 December 2018

बडी सुनी सुनी है

हे गाण सुरू होत आणि जया बाधूरी रेडिओ शोधत असते.मग तिला कळत की कुणीतरी हे गाण म्हणत आहे.खिडकीजवळ उभी राहून ती ते गाण ऐकत असते.अन हे गाण अमिताभ कॅसेटवर लावून ऐकत असतो.
हृषिकेशदा नी हे चित्रण जे दाखवल आहे ते अप्रतिम आहे.माणूस हा दु:ख ,आठवणी ह्यापासून लांब जायला मद्याचा आधार घेतो.इथे अमिताभ
हातात व्हिस्कीचा पेला धरून येरझारा मारत असतो.खुर्चीवर बसून घोट घोट प्राशान करून गाण्यांच्या सुरणांना सोबत घेऊन जणू आठवणींच्या बुचक्याच्या गाठी सोडतोय.
मद्याला कुरवाळत स्वत:लाच स्वत:शी (त्या जुन्या)
भेट घालून देतोय.
गाण्याची सुरवातच अमिताभच्या मानसिकतेच,
त्याच्या स्वत:वरच्या नाराजीच ,हळव्या पदराच दर्शन घडवत.
गाण्याच सौंदर्य दोन गोष्टीमुळे फार उठून दिसत.
एक किशोर चा धीरगंभीर आवाज (मजरूह सुल्तानपुरी चे शब्द अन सचिनदानी संगीत भुरळ पाडणार..)अन दुसर कलाकारांचा अभिनय.
हे गाण लिप्सिंग नसून कुठेच बटबट वाटत नाही.
सुंदर हसर्या फुलाची जणू हळूच उदास झालेल्या
फांदीशी ओळख करून देणार हे गीत..
मिली हा चित्रपट हृषिकेशदा च्या नभांगणातला अनमोल तारा आहे..
                       

गुलज़ार !!!


काही नाही हा...इतकं काही चांगलं नाहीये गाणं..
काही काय लिहिलंय..
असा कधीच ह्या गीतकाराबद्दल वाटलं नाही खरं तर असं फार कमी लोकांबद्दल वाटत..
टागोरांनापसुन प्रभावित झालेल्या ह्या माणसाने किती तरी लोकांना वेड लावलाय..
उर्दू कळत नसली तरी  गुलज़ारने लिहलंय म्हणजे अफाट काहीतरी असेल म्हणून सतत वाचायचं तेच ते
संदर्भ शोधायचे आणि मग ते सगळं एका घोटात प्राषण...
सगळंच पचत असं नाही पण वेगळी भूक लागते नवीन लिहिण्याची,वाचण्याची..
आजुबाजुला असलेल्या गोष्टींना बोलण्याची..
हा असा एकमेव माणूस असेल जो निर्जीव वस्तूंशी असा काही संवाद साधतो आणि मग आपण कधीच एकटे नसतो...
प्रेम निसर्ग आयुष्य मृत्यू संघर्ष हे सगळं लिहिताना स्वल्पविराम देऊन वेगळं करता आलं असत  मला पण मग गुलज़ार नसत झालं..ह्या सगळ्यांना एका चष्म्यातून पाहून किती तरी वेगळ्या विश्वात ठेवलंय ह्या अवलियाने..
माझे बाबा RD चे चाहते आणि मग ओघानं गुलज़ार कानावर पडले..
त्यांचं उर्दूविषयीच प्रेम मला माझ्या मराठी वर जीवापाड प्रेम करायला भाग पडत..
खूप गाणी आहेत त्यांची ; मला आवडणारी खूप पण आता एकच सांगेन..त्यांच्यासाठी माझ्याकडून..

"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नाही.."
तुमच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांसारखे तुम्ही असच आमच्या आयुष्यात शब्द रुपी रंग  भरावे हि ईश्वरचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
                   

मला वाटतं

मला फार वाटायचं किंवा वाटतं की मला गिटार किंवा पियानो वाजवता यायला हवा होता किंवा याव.केस वाढवून त्यांना कुरळे करून घ्यावेत.(आजी त्यांना भांड्याची घासण सारखे म्हणते)
आपला बॅंड (लग्नात वाजवतात तो नव्हे)असावा.पिंक फ्लाॅयड किंवा ब्रायन अॅडम्स च टी शर्ट त्यावर जॅकेट.
उजव्या हातावर ते बॅंडचं बॅंड असावेत.
गाठ मारून किंवा काय ते बांधून राहिलेल्या दोर्या लोंबकाळाव्यात.
(टॅटू मला आवडत नाही.)
गिटारच्या स्वरांमधे तल्लीन होऊन तिला आर्त हाक द्यावी.
माझ सगळ्यातच जवळच गाणं त्या हाकेतून गाव.

“खडा हूँ आज भी वही
...
कि दिल फिर बेकरार है
खडा हूँ आज भी वही
के तेरा इंतजार है
छू लो जो मुझे तुम कभी
खोना जाऊ मैंं रात दिन
नज़रो में तुम हो बसे
...”
त्या वातावरणात धुंद होऊन जावं अ्गदी तस जस बागेत फुलपाखर होतात,पर्वतांवर गिर्यारोहक ज्या बेभानपणे ओरडतात तस बेभान होऊन जावं,
स्वत: लिहिलेल्या  पहिल्या पुस्तकाचा वास लेखकाच्या आयुष्यात दरवळत असतो तसच प्रेक्षकांचा आपल्या गाण्याला  दिलेला कोरस निनादत रहावं .संपूच नाही वाटत.
गिटार वाजवताना एकदमच कमरेतुन मागे वाकून ते तसच वाजवत रहाणं अन आकाशाकडे  पाहून पुटपुटत रहाण ,मला वाटत काहीतरी फार दुःखातून प्रचिती देत ,मला तस करायच आहे.केस हलवून अडचणींना पळा म्हणत जोरात “सडा हक्क” म्हणायच आहे.
जमलं तर माझ आवडत इंग्रजी गाण म्हणायचं आहे.                               

चि. व चि.सौ.कां

मी लग्न करू का?
केले तर टिकेल का?
आणि तो किंवा ती मला कळेल का?
ह्याची थोडी पण वेगळ्या प्रकारे उत्तर देणारा
                                 
                                           "चि. व चि.सौ.कां."

आपलं प्रेम आहे म्हणून लग्न करूया आणि मग नाही पटल  कि मोडूया  ह्या उथळवादाला कुठेतरी समजूतदारपणाचे कुंपण हवे आणि ते कसे हवे हे दाखवलय "चि. व चि.सौ.कां." ह्या चित्रपटामध्ये.
प्रेम करतो म्हणजे माणूस कळतो असं नाही त्यासाठी सहवास किती महत्वाचा आहे हे फार सुंदर दाखवलं आहे.
प्रेमासोबत माणसाच्या सवयी स्वीकाराव्या लागतात.आपल्या काही सवयी सोडाव्या लागतात हे पाहून वाटेल कि हि तडजोड आहे पण नाही ते समर्पण असत..समर्पण नात्यासाठी आणि समर्पण आपल्या माणसाच्या आपल्यासोबत असण्यासाठी.
कोणत्याही चित्रपटाचा आत्मा हे म्हणजे त्याच लेखण.आणि मुधुगंधा कुलकर्णी ह्यांना माझ्याकडून त्रिवार नमन.
ह्या चित्रपटामध्ये अगदी  छोट्या छोट्या दृश्यामध्ये तिने जे मार्मिक भाष्य केले आहे त्याला तोड नाही.आपल्याला तो प्रसंग हसवून जातो पण कुठेतरी आपल्यामधल्या बेजबाबदारपणाला मुस्काटात मारून जातो  थोडक्यात पुणेरी भाषेत सांगायचे तर ''शालीतून जोडे".
आणि हेच प्रसंग परेश मोकाशीने फार सुंदर दिग्दर्शित केले आहात.ह्या माणसाबद्दल मी काय बोलावे.
अभिनयाबद्दल सगळेच जण उत्तम आहेत.कधी कधी काही जण कर्कश वाटतात पण कथेच्या प्रवाहात ती साखरेसारखी विरघळूनही जातात.
मला ह्या चित्रपटाची एक बाजू फार आवडली ती म्हणजे पात्रांची असलेली मार्मिकता..प्रत्येक पात्र हे बोलकं आहे.ते आरसा घेऊन उभं आहे आणि तुम्हाला ते आजूबाजूला घडणारी असलेली माणस दाखवत.
चुका दाखवत आणि चुकांतून कधी शिकत.
आणि प्रबोधन हवं असेल तर नक्कीच आहे फक्त ते तुम्हाला हास्याच्या गाडीत बसून काटेरी वारा लागेल असं आहे.त्यामुळे हसून त्यावर नकीच विचार करायला लावणारा आहे.
शेवटी हेच , श्री आणि सौ होण्याआधी एकमेकांचे तू आणि मी म्हणजे आपण होऊया हे सांगून जाणारा "चि. व चि.सौ.कां." नक्कीच पहा.
आणि आईबाबाला म्हणा लगेच माझं ठरवू नका..पहा  आधी "चि. व चि.सौ.कां."..
" मन हे तुझपाशी रमते
  अन भिरभिरते
  हरते तन वेडे तुझपाशी  घुटमळते.."

गुलाबजाम:जमून आलेल पक्वान्नं

गुलाबजाम खरचं खूप रुचकर झाला आहे .👌🏻
अभिनय,कथा,संवाद ,दिग्दर्शन सगळंच छान कस चुलीवरल्या बेसनासारख
खमंग आणि अप्रतिम झाल आहे.
छायाचित्रण मला तर श्रीखंड जितक आवडत तितक भावल आहे.
मांडणी तर पुरणपोळी सारखी गोड आणि काटेकोर ज्ञाली आहे.
कुठेच अती गंभीरता किंवा बाष्कळ विनोदीपणा जाणवला नाही जसं पुरणपोळीतून पुरण बाहेर न येतां ती सुग्रास बनते तशीच.अगदी तशीच.हो.
जी काही लोकेशन्स निवडली आहेत ती मला अगदी मनापासून आवडली आहेत.
छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली हे अगदी दिसून येत मग ते नकळत कालसुसंगत गोष्टी दाखवणं असो व व्यक्तिसापेक्ष कालानुरूप वागणं असो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे “सचिन कुंडलकर “ह्या माणसाने फक्त फूड थिम घेऊन काही बनवायचं म्हणून बनवलं नाहीये त्यात मराठी पारंपरिक जेवण जगाच्या कानोकोपऱ्यात पोहोचावं आणि पंजाबी,गुजराती सारखं मराठी जेवण  आपल्या माणसाला उपलब्ध व्हावं ही तळमळ दिसते..
 खरंच पाहून या आणि सोबत आई च्या हाताचे गुलाबजाम घेऊन जा.
आता नेऊ शकतो ना आत..

Sunday, 5 August 2018

मैत्री

बाॅलीवूड आणि मैत्री हे समीकरण फार जून आहे.कितीतरी  सिनेमे येऊन गेले मैत्री ह्या विषयावार.केंद्रबिंदू हा आणि मग आपापल्या आकलनशक्तीने कथेची वर्तुळ मांडून कितीतरी बहारदार सिनेमे बनवले गेले.मित्रांमधील संवाद,उलगडणारे नात आणि मग एकजीव बोलणारे ते जीव.
बाॅलीवूडचा प्रवास दोस्ती ह्या सिनेमापासून ते मेरे सोनू के टीट्टू की स्वीटी व्हाया शोले असा सुरूच आहे आणि तो तसाच राहतो..
एकंदर पाहील तर काही वेगळ दिसणार नाही तेच मित्र आणि मग कथा पण..जर तुमचं आयुष्य मित्र ह्या असामीने व्यापून टाकलेल असेल तरच ते नात किती निस्वार्थ आणि नरकापर्यंत पूरणार आहे ते कळेल.
दोस्ती ह्या चित्रपटामधे पाहील तर दोन्ही मित्र अपंग एक आंधळा तर एक लंगडा.
शोले मधे दोघेही चोर.याराणा मधे एक श्रीमंत एक गरिब. रंग दे बसंती मधे सगळंच वेगळ धर्म जात पंथ. दिल चाहता हा मधे बालपणीची सोबत असली तरी आयुष्या,मानवी नातेसंबंध ह्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा.आणि आता आलेला सोनू के टिट्टू की स्वीटी.
ह्यात समान धागा मैत्री असला तरी मैत्री होताना अट अपेक्षांचा डोलारा, कपड्यांच्या झालरी अन गाड्यांच्या चकाकी नसते.गरज असते त्या क्षणाची ज्यावेळी तो माणूस ह्रदयात भरतो.
ह्या एका गोष्टीसाठी बाॅलीवूडच खरच कौतुक करावंसं वाटत.
पांचट प्रेमकथेपेक्षा मैत्रीवरच अजून चित्रपट बनवावेत .
आज आंग्लभाषेचा मैत्री दिवस असल्याने हा लेखन प्रपंच.


माझ्या आयुष्यात खुप मित्र आहेत आणि त्यासाठी मी मला सुदैवी म्हणेन..
मी सुदामा झालो तरी हरकत नाही कृष्ण आयुष्यात भरभरून मिळावेत हीच इच्छा.

Thursday, 19 July 2018

पावसाचे गाणे - पहिलं गाणं

पाऊस आला कि अनाहूतपणे भिजण्याची हौस येते..
पाऊस आला कि आठवण येते , उगाच उमाळे दाटून येतात आणि उगाच डोळ्यांच्या कडा पाणावतात..
पाऊस आला कि भज्यांचा  बेत ठरतो आणि फुरक्या  मारून चहा पिणे ओघाने येते..
हे सगळं असं वेगळं आणि आपलंस वाटणार का घडत बरं?

इतक्या दुरून येणारा पाऊस मला ,तुम्हाला ,सगळ्यांना इतका जवळचा का वाटतो??
त्याचा वेग, गती आणि प्रमाण सगळं सारखं असत पण तो सगळ्यांसाठी वेगळा त्यांचा  हक्काचा  साथीदार असतो..कुणाला खिडकीतून हात सोडून गेलेल्या प्रियतमासारखा भासतो तर कुणाला उगाच चिखल करणारा आचरट  निसर्गाच रूप..कुणाला मुक्त दिसतो तर कुणाला गरजेपुरता देव विद्रुप..
कुणासाठी काही असला तरी सगळ्यांना त्याच्याशी बोलायचं..

मग आपण आज पाहूया कवी सौमित्राला त्याच्याशी काय बोलायचं..

पाऊसाचे  गाणे - पुन्हा पावसालाच सांगायचंय

                  " पुन्हा  ढग  दाटून  येतात  पुन्हा  आठवणी  जाग्या  होतात
                   तिचे  माझे  सारेच  पावसाळे  माझ्या  मनात  भिजून  जातात
                    पुन्हा  पाऊस  ओला  ओला  पुन्हा  पाऊस  बांधून  झुला
                    तिच्याकडले  उरले  झोके  परत  करतो  माझे  मला
                    पुन्हा  पाऊस  खूप  ऐकतो  पुन्हा  पाऊस  खूप  बोलतो
                    त्याच्य  माझ्या  गप्पांमधले  तिचे  थेम्ब  अलगद  झेलतो
                    पुन्हा  पावसाला  सांगतो  मी i पुन्हा  पावसाशी  बोलतो  मी
                   माझे  तिचे  आठवणी  थेम्ब  पुन्हा  पावसालाच  मागतो  मी "

काय लिहिलंय ना !! येणाऱ्या पावसापेक्षा त्याला प्रेमाने आपल्याकडे पाठवणारे ढग तिच्या आठवणी जाग्या करतात. मनाची अशी काही अवस्था होते कि आता डोळ्यांमधून पाणी न येता  ते मनाच्या चक्षुने पाझरू लागत आणि मग तिची पहिली भेट, तिची ती पहिली मिठी आणि ते सगळंच पावसाळ्याचे आगमन होऊन मनात असा काही कोलाहोल माजतो कि आता कोणती आठवण काढून रडावं आणि हसावं हा गोंधळ उडतो आणि त्यात मी अलगद ह्या माझ्या पावसाळी मित्रांसोबत चिंब भिजून जातो..
आणि हा माझा दूरचा मित्र इतका माझ्यावर प्रेम करतो कि तिच्या माझ्या प्रेमाच्या सफरीवर हाही आला होता.ह्याने आमच्या प्रेमाचा बहर पाहिलं.मोहरलेलं प्रेम अनुभवलं आणि आमच्या गप्पांच्या झुल्याला अलगद झोके देत राहिला आणि आज तेच झोके थेंबांनी मला हळूच वापस करतोय..
मी ह्याच्याशी असंबद्ध बोलतो.कुठेही असो डोंगरावर,गाडीवर ,आडोश्याला वा  खिडकीत..पण बोलतो आणि मग काळाच्या पडद्यामागे गेलेलं काही क्षण ,तिचे-माझे क्षण त्यालाच मागतो मी...

                                      "पुन्हा  पावसालाच  सांगायचे
                                       कुणाला  किती  थेम्ब  वाटायचे

                                       मऊ  कापसाने  दारी  गोठली
                                       ढगांनी  किती  खोल  उतरायचे

                                      घराणे  मला  आज  समजावले
                                       भिजुनी  घरी  रोज  परतायचे

                                      तुझी  असावे  पाझरू  लागत
                                      खऱ्या पावसाने कुठे  जायचे?"

मिलिंद इंगळेंनी लावलेली  चाल,दिलेला आवाज  आणि सौमित्रचे शब्द इतके चपखल आहेत  की वाटत आता खरंच मी पावसाला काही सांगणार आहे आणि त्यांनी सांगितलंच आहे ,आपल्या  सगळ्यांकडून..
परत परत पावसाला सांगणार आहे,,आज सांगणार .काल सांगितलं ,उद्या सांगेन..

"असेन मी नसेन मी
तरी असेल पाऊस हा
कुणीतरी असेल ह्याला सांगायला "
पाऊस हा फोटॉन आहे..आठवणींचे ,क्षणांचे, विरहाचे, प्रेमाचे, मिलनाची गाठोडे  घेऊन हिंडणारा फोटॉन..
म्हणून मित्रा  गाठोडं हळू हळू सोड..सगळ्यांच्या तळ  हातावर हवं तितकं आणि योग्य तळ कर..
माझ्या अश्रूंचा प्रवास(ह्यात खूप काही आलं ) आज कुणीतरी अडवला आहे..आणि मग ह्या ढगांना मी परत  का बोलावू?
त्यांनी किती यायचं आणि माझा बांध तोडायचा ..आता मीच मला माझ्या बांधलेल्या मनस्वी घरात भिजून नेणार आहे...कल्पनांना आणि विचारांना  भिजवाव  लागेल ना..चिंब भिजणे म्हणजे माझे मला भेटणे..माझ्यातल्या  तिला पाहणे..आणि मग तिला पाहून माझे हरवणे  माझ्यातच..म्हणून "घराने मला आज समजावले भिजून रोज घरी परतायचे .."
हे आहे पण कधी मला हि तू आठवत असशील..हातांवर तळ साचवून त्यात चिंब भिजत असशील आणि माझ्या  मनाच्या कोपऱ्यातली तू हि हेच करतेस..
हळूच माझी कविता आठवून  आसवं गाळत असशील.कविता म्हणतही असशील पण रडू नकोस..तू रडलीस तर हा पाऊस निघून जाईल.त्याला वाटेल त्याने रडवले तुला आणि मग आपल्या  दोघांचे झोके मी मागू कुणाला?
रडू नकोस..
म्हणूनच तर
"पुन्हा  पावसालाच  सांगायचे
कुणाला  किती  थेंब  वाटायचे "

माझ्याकडून थोडंसं पावसासाठी:
“ पावसासाठी काहीतरी
त्याला काय देतो नाहीतरी??
मी आणि तो असलो ;कि ती
येते आपसूकच
लय तो, चाल ती आणि शब्द माझेच...”

एक सकाळ

गाढ झोपेतून जागा होऊन ताडकन उठून बसलो की लगेच चक्कर आली. माहीती होते जाग आली की लगेच असे ताडकन न उठता एका अडंगावर येऊन उठायचे असते. विचारच इ...