Saturday 5 May 2018

डाक


पिवळ्या रंगाच एक कडक असा कागद मिळायचा.
एका बाजूला पत्ता लिहिण्यासाठी ओळी असायच्या..उरलेल्या मोकळ्या जागेत मग जे लिहायच ते लिहायच.
माझे आजोबा आईला पत्र लिहायचे.फोन नव्हताच अस नाही पण महाग होता आणि त्या पैशात तीन चार वेळेस पत्र लिहून व्हायचं.
खूप काही जागा नसायची पण मुलीला मी आठवतो हे तिची तब्येत विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न असायचा.
त्यांच्या ऋणानुबंधासोबत मला डाक घेऊन येणार्या काकांच जास्त अप्रूप वाटायच.
किती तरी भावना,कितीतरी आवेश घेऊन येणारा हा माणूस..
मी नेहमी त्यांना विचारायचो माझ पत्र कधी येणार.
येईल रे अस म्हणायचे आणि हसून सायकलवरून डाकांचा भार घेऊन निघून जायचे.काही वर्षांनी मला
शिष्यवृत्ती मिळाल्याच पत्र आल पण ते काका नव्हते तेव्हा आणि आजोबांनी नंतर कधी पत्र पाठवलच नाही..मी मोठा झालो पण आजही त्यांच्या सायकलीचा आवाज कानात रूंजी घालत 
असतो.
ह्याच पत्रांना पाठवायला तिकिट चिटकवावी लागत असे.
वेगवेगळ्या महापुरूषांचे चित्र असलेली.
त्यांचा नेमका अर्थ आजही माहीत नाही मला.
कोणत तिकिट कधी वापरतात ह्याच कवडीमोलही 
ज्ञान नाही.खरतर त्याच फारस घेणदेण नव्हतच मला तेव्हा.
ती तिकिट आणून वही भरवण्याची हौस. माझे आबा ही हौस पूर्ण करायचे.
हळूहळू दिवस जात होते आणि काळ सरत होता आणि डाक पेक्षा दूरध्वनी जवळचा झाला.
आज कितीतरी अद्ययावत साधन आलेली आहेत पण भावना वाचून आसव गाळण राहून जात.
भीतीपोटी प्रेमपत्र उशाशी कुणी ठेवत नाही.मामाच पत्र हा खेळ कदाचित म्हणून कुणी खेळत नसेल.
बिलही आजकाल फार घरी येत नाहीत.
राखी तरी येते का टपालाने?
जग बदलत तस बदलाव लागत पण डाक,तिकिट आणि पोस्टमन काका सदैव आठवणीत असणार.
उन्हाळयात त्यांची आठवण दाटून आली कारण त्यांना फक्त थोडंसं पाणी लागायच.बस्स.
बाकी सायकल ,टपाल आणि प्रवास असाच असायचा.
ही आठवण त्यांना समर्पित.

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...