Tuesday 14 November 2023

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्य उपक्रम राबवतात. जे कीर्तन ऐकण्याचा योग आला त्या कीर्तनांचा सार लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

*अश्विन शुध्द तृतीयेला झालेल्या कीर्तनाचे सार..*


कीर्तनकार : ह.भ.प. विक्रमजी नांदेडकर 

आपला एकच धर्म आहे ज्यात ज्ञानोबा माऊली जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात म्हणू शकतात.परंतू धर्माने दिलेली सुविधा आणि सूटचा अतिरेक धर्म विमुख कार्य करण्याचे प्रमाणपत्र नसते हे आपल्याला कळायला हवे .

विकार युक्त मन आणि व्याधी ग्रस्त देह हे समान आहेत पण देहाचे उपचार वैद्य करू शकतील पण मनाचे उपचार आपली सद्गविवेक बुध्दी आणि विकारहीन मनाने भगवंताचे नामस्मरण यानेच होऊ शकतात.

संतांच्या चरित्रात कारूण्य असूनही सुख, समाधान आणि भगवंताचे अधिष्ठान आहे आणि आपल्याला त्यांच्या तुलनेत सुख असूनही आचरणात , बोलण्यात कारूण्यच असते. 

आपले आचरण धर्मसंगत होईल, ग्रंथ वाचण्यापेक्षा जास्त त्यांच आचरण जास्त होईल तेव्हा आपण देवाला आपल्या जवळ घेऊन येऊ.

केशवसुतांची कविता आहे ,त्यातल्या चार ओळी .

“सदा पद्य घोकोनियां शीण येतो

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ॥

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे

प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ “

*अश्विन शुध्द चतुर्थीला झालेल्या कीर्तनाचे सार…*

कीर्तनकार : ह.भ.प. रामकृष्ण महाराज जामकर

करून करून भागले आणि देवपूजेस लागले आपण असे साधारण म्हणत असतो. सामान्य मनूष्याच्या आयुष्याचा भागच पैसे कमावून, सुख मिळवून मग भगवंताच्या चरणी लीन व्हावे ह्या गृहितकावर आधारित असतो. पण आयुष्याच्या कोणत्याही आश्रमात भगवंत स्मरण हे लागतेच. भगवंताचे स्मरण म्हणजेच स्वतःच्या रूपाला , स्वतःच्या जन्माचे कारण कळणे हाच होय. संत मीराबाईंचे चरित्रातून आपल्याला हेच शिकायला मिळते .

स्वतःच्या सत्वाला ओळखणे हाच खरा मोक्ष होय आणि ह्याला प्राप्त करायला  भगवंताचे स्मरण हा उपाय होय. द्वैताकडून अद्वैताकडू जाण्याचा प्रवास म्हणजेच स्वतःमधील भगवंताला शोधणे होय. रामदास स्वामींच्या ओळी इथे सार्थ ठरतात.


जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥

*अश्विन शुध्द पंचमीला झालेल्या कीर्तनाचे सार..*


कीर्तनकार : ह.भ.प. अवधूत महाराज टाकळीकर


हिंदू धर्मात चार आश्रम, चार पुरूषार्थ आणि सोळा संस्कार असून ह्या सर्वांना बांधणार दुवा कोणता असेल तर ते म्हणजे तुमचे कर्म.

जसे क्रियेविन वाचळता व्यर्थ आहे अशी म्हण आहे म्हणजेच फक्त बोलून दाखवण्यापेक्षा कृती करावी असा अर्थ होतो तसेच कर्मेविना जन्म व्यर्थ होय असेच म्हणावे लागेल. कर्म जसे असेल तसे भोग, तसे फळ तर मिळतेच.

आयुष्याचे संचित काय असेल तर ते तुमचे कर्म होय. मनुष्याने परमेश्वाराचे चिंतन करावेच पण कधी तरी निवांत बसून आपल्याच चालू आयुष्यातील कर्मांचे चिंतन करणे ही कर्मप्राप्त आहे. कर्माचे चिंतन हाच संसरीक ते ऐहीक ह्या प्रवासाचा दुवा म्हंटले तरी वावगे ठरणार नाही . कर्माचे चिंतन हाच आनंदाचा मार्ग होय. समर्थ सांगतात तसे


मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥


- संजीत चौधरी 

Saturday 11 April 2020

अनंताचे फुल

आपण प्रवास करत असताना एखादे झाड, एखादं घर आपल्याला आपलं वाटून जात. वाटतं ह्याचा आणि माझा संबंध फार जवळचा आहे .घट्ट ऋणानुबंध आहे. काही घटना आपल्या आयुष्यात आधी घडून गेल्यासारख्या वाटतात त्या सगळ्या प्रकाराला  देजावू म्हटलं जात. पण जेव्हा एखादी वस्तू , एखादं झाड पाहिल्या-पाहिल्या त्याचा ऋणानुबंध जाणवतो त्याला काय म्हणणार आपण ?
 मला वाटतं उत्तर आपल्या संवेदनशील मनात आणि त्यावर झालेल्या  जडणघडणीमधे आहे. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या माणसाला सिमेंटच्या शहरात छोटंसं रोपट पाहूनही सकारात्मक वाटतं. श्रीमंत माणसाला एखादी नवीन कार पाहून सकारात्मक वाटत असेल .
        आपल्या आवडीनिवडी ,आपल्याला लाभलेला सहवास ह्या सगळ्या गोष्टी समोर येणाऱ्या वस्तूशी आपला आगंतूक संबंध सोडून जातात. तसाच संबंध माणसांशी देखील  जोडला जातो.अनोळखी शहरात गाडीची नंबर प्लेट MH_२६ पाहीली की आम्हा नांदेडकरांचा उर उचंबळून येतो. विदर्भाच पिठलं जिथे मिळत कळलं की  वऱ्हाडी पोरं तिथे धूम ठोकतात. समोरच्या माणसाची एक सवय त्या माणसाला आपल्या हृदयाची  वेगळी जागा देऊन टाकते. ती सवय माणसाच्या रंगरूप, देखणेपणा या सर्वांच्या निरपेक्ष असते . प्रेमाचा ,आपुलकीचा अंकुर फुटायला या आगंतूक परिचयाचा आधारही महत्त्वाचा असतो. "द. मा. धामणस्कर" ह्यांनी याचे यथार्थ वर्णन फार सुंदर  ओळींनी केलेले आहे.


                          "  तुझ्या केसात
                अनंताचे फूल आहे म्हणजे
                तुझ्याही अंगणात अनंताचे
                झाड आहे, ह्या जाणिवेने मी
                मोहरुन जातो.
                नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात
                एक तरल संबंध रुजून
               आलेला मी पाहतो…"


 तू तुझ्या लांब केसात अनंताचे फुल माळतेस.( तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला आवडणाऱ्या मुलींने जे फुल माळले ते घ्या)
तू माळतच आहेस तर मी असं समजून घेतो , तुझ्या घरात अनंताचे झाड आहे. त्या झाडाला तू प्रेमाने वाढवले आहेसं , जोपासत आहेस .त्याचा गंध तुला मोहित करतो. तुझ्या चेहऱ्यावर असणाऱ्या ताजेपणाचे कारण ते अनंताचे  झाड आणि त्याच्या प्रती असलेले तुझे प्रेम आहे. तुला त्या झाडाविषयी, फुलांविषयी, निसर्गाविषयी ममत्व आहे. सृष्टी सौंदर्याची लोचने म्हणून अनंताचे झाड, तू तुझ्या अंगणात वाढवले आहेस.
           तुझे अंगण  किती मोठे किती लहान आहे हे मला माहित नाही पण; तु त्या अनंताला वाढवले आहेस हे खूप आहे.फक्त तुला पाहून आणि त्या सुंदर फुलाला तुझ्या लांब वेणीत माळलेले पाहून  मला आपल्यात एकत्र संबंध रूजतोय हा विचार ,हा अनुभवही मोहरून टाकतो आहे.  ह्यावेळी मला तुझे नाव- गाव  काहीही माहित नाही,  पण तू आता अनोळखी नाहीस हे मात्र खरे.
         किती निष्पाप आणि निर्वाज्य भावनेने धामणस्कर ह्यांनी मानवी स्वभाव उलगडला आहे.मानव म्हणून आपण सतत प्रेम, आपुलकी शोधत असतो.आपण आपल्या सारखी माणसे शोधत असतो.आणि आवडी,जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ,घडणाऱ्या आणि घडवणाऱ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याविषयी मत हे जुळून आले तर प्रेमाचा अंकुर नकळत फुटतो.
         गुलाबाच्या काट्याचाही विचार करणारे आगंतूक एकत्र येऊन फुलबाग फुलवतात तेव्हा ती तरलता मोहून टाकणारी असतेच.

Saturday 9 March 2019

पुष्पक विमान


आजोबांच्या थरथरत्या हातांना धरून घेऊन जा पुष्पक विमान पहायला.
तुमच्या सर्वात पहिल्या मैत्रीची सुरवात आठवेल.
तो पहिला मित्र आठवेल जो आता बाजूला बसलाय ज्याने निरपेक्ष मैत्री काय असते नकळत शिकवल.
लाड पुरवणार हक्काच माणूस म्हणजे आजोबा.
त्यांना तुमच्या गुणांच,शाळेच्या प्रगतीच,भविष्याच्या डोलार्याच ओझं नसत.तो माणूस तुमच्या भावविश्वात येऊन जगत असतो.स्वच्छंदी.
तुम्ही एकदम आजोबा म्हणताना सरळ नावाने जरी हाक मारली तर तुम्हाला अहो जातो ने प्रतिसाद देणारा हा आपल्या आयुष्यातला अवलिया त्याच्या आयुष्यात नातवाला सर्वस्व सहजपणे अर्पण करतो.
आजीच सोवळ हा आजोबा नातवासाठी कस फाट्यावर मारतो हे मी फार जवळून पाहीलय ,अनुभवलय.
आजोबा आपली खरच सुरवात असतात आणि त्यांचा आपण शेवट असतो का ह्यापेक्षा नातवाच्या आगमनापासून फक्त नातूच श्वास असतो.
श्वास चित्रपटानंतर आजोबा आणि नातवाच्या रेशमासारख्या नात्यावर बोलणार्या मोजक्या चित्रपटापैकी पुष्पक विमान हा एक.
जरूर पहा!!!!
आजोबाच वयं वाढल ते काही गोष्टी विसरत जातात पण नातू तसाच त्यांच्या आयुष्यपटावर खेळत असतो नव्हे ते खेळवत असतात.
म्हणून चटका लावून गेल तरी नातू त्यांचा नकळतपणे शेवट असतोच आणि ते प्रत्यक्ष अनुभवण एक नकोशी जखम ..
आबासाठी..

प्रवास

किशोरची गाणी होती सोबत
वाट मागे सरत होती....
ऑटोच्या प्रवासात ती सोबत होती.
ठिकाण दर  ठिकाण ऑटो होता थांबत,
आणि मग लागलेल्या  दिव्यात
ती दिसत मला होती...
प्रवास सुरु होत असे  मग
आणि दिवे विझवी चालक तो..
गाण्यात गुंग मी ; तिला परत
पाहायला उतावीळ  मी जो..
कधी लागे "कभी कभी",
तर कधी "तुम बिन"..
उशिरा सोडलेल्या मॅनेजर चे
चुकवू  कसे मी ऋण..
लागले मधेच
"तेरा मुझसे है पेहले का नाता कोई"..
आणि आमच्यातला शेजारी असून
एकांत झाला जड डोई..
गर्दी कमी होत होती..
वाढत होती..
माणसं होती उतरत..
काही नवे लोक होती बसत ...
धडपड पाहून चालकाची,
 "कळी" ती हसली खुदकुन..
आणि मी पहिले त्या
बोलक्या डोळ्यात चमकून....
गर्दी होणारच आहे असच बसावं लागेल आपल्याला
म्हणाली ती हसत "मला"..
उगाच वाटलं मला ,
"आवडला अबोल सहवास माझा तिला"...
अशीच  गाणी बदलत होती ...
आणि तसच ती दूरवर,
 सोबत माझ्या येत होती..
उडणारे केस माझ्या चक्षुंवर स्पर्श करत होते..
काहीतरी मला जणू  खुणावत होते..
मधेच गाणी  झाली बंद
आणि हळूच उतरली ती ..
वाटलं तोडली जणू
कळी कुणीतरी ती..
लागलं गाणं परत
"कोई हमदम ना राहा" ..
आणि दिवा परत लागला,
बसलं "कुणीतरी" परत बाजूला..
आणि किशोरचा सूर परत.
"ये शाम मस्तानी "चा  लागला..
मग परत प्रवास झाला सुरु ..
बोलका एकांत परत सुरु...    
  (प्रवास माझाच आहे बरं का!!!)

चवदार “कूक”



श्रीकांत निळेवाड चा मॅसेज वाचून मी आॅफीस मधे असून किंचाळलो “Yes” म्हणून.
सगळे पहात होते हे सांगायला नकोच.
पण मग वाटल किती नालायकपणा आहे हा .
मॅसेज होता कुक च्या रिटायरमेंटचा.
मला सचिन निवृत्त व्हाव वाटत नव्हता ह्याच कारण हाही माणूस होता.
त्याच खेळणं,त्याचा तो भन्नाट फाॅर्म पाहून सचिन देवाच्या रेकाॅर्डला सुरूंग लागणार हे नक्की वाटत होत .
जितका दिसायला देखणा तितकाच खेळण्यात जबरदस्त.त्याचा ड्राईव्ह माझा फेव्हरेट.
कुक म्हणजे इंग्लिश क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेट चा मुकुट मनी .
मला कधीच सोयरसुतक नव्हत जिंकल कोण ?
चिंता होती ती ह्याच्या शतकाची जे होऊ नाही वाटत
(विराट बाबतही वाटत )
फलंदाजी करताना जोडीदार बदलला की खेळावर परिणाम होतो.तुम्हाला तुमची पध्दत थोडीशी बदलावी लागते ,कुक ने तब्बल सात खेळाडूंसोबत डावाची सुरवात केली आहे.ट्रेस्कोथिक पासून ते जेनकिंग पर्यंत .आता पर्याय कुक साठी शोधावा लागणार ह्याची खंत आहे.
कुक ने इंग्लिश क्रिकेट ला भरभरून दिल आहे आणि क्रिकेट ला पण..
तुला खूप शुभेच्छा.
मी एवढच म्हणेन तू परत ये पण शतक करू नकोस.
We will miss that top class player and beyond that gentleman player .
Hats off to you Alester Cook..
🙌🏻🙌🏻
           

हा पेन


आज किती दिवसांनी विकत घेतलाय.
ह्या पेनची आणि माझी आठवण फार जूनी आहे.अगदी शाळेपासूनची.
मुल कमी गुण मिळाले म्हणून मार खायचे आणि मी अक्षरावरून मार खायचो.
कधीतरी येणारी त्सुनामी बाबांच्या अंगात यायची आणि मला भा रा तांबे,विंदा ह्यांना लिहून काढावे लागे.
कुसुमावतींचा “दमडी” धडा तर पाठ झाला होता.
मला उदाहरण देत असत हीच अक्षर बघ ,तिच बघ ..सगळी मुलींचेच..
माझी सगळी मित्र सारखीच.
एका मैत्रिणीच अक्षर चांगल होत,म्हणल तु लिहीते तस लिहावं ,तोच पेन घ्यावा.तेव्हा कुठे माझा ह्या पेनशी संबंध आला.
मग जितक्या लोकांची अक्षर चांगली आहेत तसच पेन धरून लिहायच यत्न केला.
अंगठा आणि पहिल बोट,अंगठा ,पहिल बोट अन मधल बोट अस काहीस त्रिकूट मग पेन अंगठा आणि मागे मधल बोट आधाराला..
काही झाल नाही.
अक्षर आणि मी दोघंही तसेच राहीलो.आळशी.
हळू लिहील तर चांगल येत नाहीतर काही एक येणार नाही वाचतां.
(टीप:बाबांच अक्षर चांगल असेल तर फार मार बसतो.)
                 -आळशी संजीत

Monday 21 January 2019

गादी मन

गादीमधला कापूस विरळ झाला ,किंवा पाणी वगैरे सतत पडल की अस खडे तयार होतात .समतल अस रहात नाही.झोपताना फार त्रास होतो.
मान आवटाळणे,पाठदुखी होते मग.
उपाय एकच गादी बदला अथवा गादीमधला कापूस बदला.
दोन्ही शक्य नसेल तर सरळ चटई ,सतरंजीचा अवलंब करा.
गादी आठवली कारण आपल ही थोडस तसच प्रकरण आहे.विचार विरळ झाले किंवा निश्चय ढळला की मग हळूहळू न्यूनगंड अन नैराश्येचे खडे बोचू लागतात आणि आपण आळसाच्या आडगांवर ,कारणांच्या समतल भागावर आकृष्ठ होऊन गाडी ढकलत ठेवतो.
नको हे अस.करूया थोडासा बदल.
देऊ ताणून जातील पाय जितके जायच लांब अन मग स्थिर होऊन झोपेच अंथरूण अन विचाराच स्वत:शी असलेल समीकरण समतल करून घेऊ.
कापूस भरूया.भरत राहू.
शांत झोप अन स्थिर मन हवच ना !!!
(गादी बदलतो शनिवारी मी 😬😜)
                               -संजीत चौधरी

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...