आज किती दिवसांनी विकत घेतलाय.
ह्या पेनची आणि माझी आठवण फार जूनी आहे.अगदी शाळेपासूनची.
मुल कमी गुण मिळाले म्हणून मार खायचे आणि मी अक्षरावरून मार खायचो.
कधीतरी येणारी त्सुनामी बाबांच्या अंगात यायची आणि मला भा रा तांबे,विंदा ह्यांना लिहून काढावे लागे.
कुसुमावतींचा “दमडी” धडा तर पाठ झाला होता.
मला उदाहरण देत असत हीच अक्षर बघ ,तिच बघ ..सगळी मुलींचेच..
माझी सगळी मित्र सारखीच.
एका मैत्रिणीच अक्षर चांगल होत,म्हणल तु लिहीते तस लिहावं ,तोच पेन घ्यावा.तेव्हा कुठे माझा ह्या पेनशी संबंध आला.
मग जितक्या लोकांची अक्षर चांगली आहेत तसच पेन धरून लिहायच यत्न केला.
अंगठा आणि पहिल बोट,अंगठा ,पहिल बोट अन मधल बोट अस काहीस त्रिकूट मग पेन अंगठा आणि मागे मधल बोट आधाराला..
काही झाल नाही.
अक्षर आणि मी दोघंही तसेच राहीलो.आळशी.
हळू लिहील तर चांगल येत नाहीतर काही एक येणार नाही वाचतां.
(टीप:बाबांच अक्षर चांगल असेल तर फार मार बसतो.)
-आळशी संजीत
No comments:
Post a Comment
खूप आभारी आहे.🙏🏼