Thursday 19 July 2018

पावसाचे गाणे - पहिलं गाणं

पाऊस आला कि अनाहूतपणे भिजण्याची हौस येते..
पाऊस आला कि आठवण येते , उगाच उमाळे दाटून येतात आणि उगाच डोळ्यांच्या कडा पाणावतात..
पाऊस आला कि भज्यांचा  बेत ठरतो आणि फुरक्या  मारून चहा पिणे ओघाने येते..
हे सगळं असं वेगळं आणि आपलंस वाटणार का घडत बरं?

इतक्या दुरून येणारा पाऊस मला ,तुम्हाला ,सगळ्यांना इतका जवळचा का वाटतो??
त्याचा वेग, गती आणि प्रमाण सगळं सारखं असत पण तो सगळ्यांसाठी वेगळा त्यांचा  हक्काचा  साथीदार असतो..कुणाला खिडकीतून हात सोडून गेलेल्या प्रियतमासारखा भासतो तर कुणाला उगाच चिखल करणारा आचरट  निसर्गाच रूप..कुणाला मुक्त दिसतो तर कुणाला गरजेपुरता देव विद्रुप..
कुणासाठी काही असला तरी सगळ्यांना त्याच्याशी बोलायचं..

मग आपण आज पाहूया कवी सौमित्राला त्याच्याशी काय बोलायचं..

पाऊसाचे  गाणे - पुन्हा पावसालाच सांगायचंय

                  " पुन्हा  ढग  दाटून  येतात  पुन्हा  आठवणी  जाग्या  होतात
                   तिचे  माझे  सारेच  पावसाळे  माझ्या  मनात  भिजून  जातात
                    पुन्हा  पाऊस  ओला  ओला  पुन्हा  पाऊस  बांधून  झुला
                    तिच्याकडले  उरले  झोके  परत  करतो  माझे  मला
                    पुन्हा  पाऊस  खूप  ऐकतो  पुन्हा  पाऊस  खूप  बोलतो
                    त्याच्य  माझ्या  गप्पांमधले  तिचे  थेम्ब  अलगद  झेलतो
                    पुन्हा  पावसाला  सांगतो  मी i पुन्हा  पावसाशी  बोलतो  मी
                   माझे  तिचे  आठवणी  थेम्ब  पुन्हा  पावसालाच  मागतो  मी "

काय लिहिलंय ना !! येणाऱ्या पावसापेक्षा त्याला प्रेमाने आपल्याकडे पाठवणारे ढग तिच्या आठवणी जाग्या करतात. मनाची अशी काही अवस्था होते कि आता डोळ्यांमधून पाणी न येता  ते मनाच्या चक्षुने पाझरू लागत आणि मग तिची पहिली भेट, तिची ती पहिली मिठी आणि ते सगळंच पावसाळ्याचे आगमन होऊन मनात असा काही कोलाहोल माजतो कि आता कोणती आठवण काढून रडावं आणि हसावं हा गोंधळ उडतो आणि त्यात मी अलगद ह्या माझ्या पावसाळी मित्रांसोबत चिंब भिजून जातो..
आणि हा माझा दूरचा मित्र इतका माझ्यावर प्रेम करतो कि तिच्या माझ्या प्रेमाच्या सफरीवर हाही आला होता.ह्याने आमच्या प्रेमाचा बहर पाहिलं.मोहरलेलं प्रेम अनुभवलं आणि आमच्या गप्पांच्या झुल्याला अलगद झोके देत राहिला आणि आज तेच झोके थेंबांनी मला हळूच वापस करतोय..
मी ह्याच्याशी असंबद्ध बोलतो.कुठेही असो डोंगरावर,गाडीवर ,आडोश्याला वा  खिडकीत..पण बोलतो आणि मग काळाच्या पडद्यामागे गेलेलं काही क्षण ,तिचे-माझे क्षण त्यालाच मागतो मी...

                                      "पुन्हा  पावसालाच  सांगायचे
                                       कुणाला  किती  थेम्ब  वाटायचे

                                       मऊ  कापसाने  दारी  गोठली
                                       ढगांनी  किती  खोल  उतरायचे

                                      घराणे  मला  आज  समजावले
                                       भिजुनी  घरी  रोज  परतायचे

                                      तुझी  असावे  पाझरू  लागत
                                      खऱ्या पावसाने कुठे  जायचे?"

मिलिंद इंगळेंनी लावलेली  चाल,दिलेला आवाज  आणि सौमित्रचे शब्द इतके चपखल आहेत  की वाटत आता खरंच मी पावसाला काही सांगणार आहे आणि त्यांनी सांगितलंच आहे ,आपल्या  सगळ्यांकडून..
परत परत पावसाला सांगणार आहे,,आज सांगणार .काल सांगितलं ,उद्या सांगेन..

"असेन मी नसेन मी
तरी असेल पाऊस हा
कुणीतरी असेल ह्याला सांगायला "
पाऊस हा फोटॉन आहे..आठवणींचे ,क्षणांचे, विरहाचे, प्रेमाचे, मिलनाची गाठोडे  घेऊन हिंडणारा फोटॉन..
म्हणून मित्रा  गाठोडं हळू हळू सोड..सगळ्यांच्या तळ  हातावर हवं तितकं आणि योग्य तळ कर..
माझ्या अश्रूंचा प्रवास(ह्यात खूप काही आलं ) आज कुणीतरी अडवला आहे..आणि मग ह्या ढगांना मी परत  का बोलावू?
त्यांनी किती यायचं आणि माझा बांध तोडायचा ..आता मीच मला माझ्या बांधलेल्या मनस्वी घरात भिजून नेणार आहे...कल्पनांना आणि विचारांना  भिजवाव  लागेल ना..चिंब भिजणे म्हणजे माझे मला भेटणे..माझ्यातल्या  तिला पाहणे..आणि मग तिला पाहून माझे हरवणे  माझ्यातच..म्हणून "घराने मला आज समजावले भिजून रोज घरी परतायचे .."
हे आहे पण कधी मला हि तू आठवत असशील..हातांवर तळ साचवून त्यात चिंब भिजत असशील आणि माझ्या  मनाच्या कोपऱ्यातली तू हि हेच करतेस..
हळूच माझी कविता आठवून  आसवं गाळत असशील.कविता म्हणतही असशील पण रडू नकोस..तू रडलीस तर हा पाऊस निघून जाईल.त्याला वाटेल त्याने रडवले तुला आणि मग आपल्या  दोघांचे झोके मी मागू कुणाला?
रडू नकोस..
म्हणूनच तर
"पुन्हा  पावसालाच  सांगायचे
कुणाला  किती  थेंब  वाटायचे "

माझ्याकडून थोडंसं पावसासाठी:
“ पावसासाठी काहीतरी
त्याला काय देतो नाहीतरी??
मी आणि तो असलो ;कि ती
येते आपसूकच
लय तो, चाल ती आणि शब्द माझेच...”

नवरात्रातील कीर्तनांचे सार

 माझ्या गावात मुदखेडमधे श्री कालेजी देवी (मूळ स्थान माहूर) मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव खूप उत्साहात साजरा करतात. कीर्तन , भजन आणि असे असंख्...